Posts

Showing posts from June, 2020

मुलुख मैदान या तोफेचा युद्धामध्ये किती वेळा वापर करण्यात आला आहे?

Image
मलिक-इ-मैदान तोफ (फारसी शब्द-अर्थ:मैदानाचा राजा).आज जरी ती तोफ आदिलशाहीची म्हणून ओळखली जात असली तरी या तोफेचा जन्म मूळ निजामशाहीमध्ये झाला.१५४९ साली बुर्हान निजामशह याचा तोफखान्यावरील तुर्की अधिकारी चलबी रुमीखान दखनीयाने ही तोफ अहमदनगर येथे बनवली.रुमीखान हा मूळचा तुर्कस्तानचा.मलिक-ए-मैदान तोफेच्या निर्मिती च्या वेळी म्हणजेच सोळाव्या शतकात ती जगातील सगळ्यात मोठे शस्त्र होती.अहमदनगर येथे ज्या मुशीतून या तोफेची निर्मिती करण्यात आली ती जागा आजही प्रसिद्ध आहे. तोफेचा धमाका एवढा मोठा होता की बत्ती देणारा सैनिक मरण्याची शक्यता असल्याने शेजारीच एक पाण्याचा हौद बांधलेला आहे, जेणेकरून बत्ती दिली रे दिली की हौदात उडी मारुन पाण्यात बुडी मारुन बसायचे कारण पाण्यात लपल्यामुळे आवाजाचा हादरा कमी बसे हा त्यामागचा हेतू ! ही निजामशाही काळात अहमदनगर येथे इ.स. १५४९ मध्ये तयार केलेली तोफ आहे. हिला मलिक मैदान तोफ किंवा मुलुख मैदान तोफ या नावानेही ओळखले जाते. या तोफेचे वजन ५५ टन असून निजामशाहीतील राजा बुर्हाणशहा याच्याकडे काम करीत असलेला तुर्की सरदार रुमीखान दख्खनी याने तांबे, लोखंड व जस्ताच्या मिश्रणातून अहमद...

चार्ली चॅप्लिन -जगाच्या इतिहासातील सर्वात कमनशिबी व्यक्ती.

Image
चार्ली चॅप्लिन स्वतःच्या मूक अभिनयाने सगळ्या जगाला हसवणारा हा अवलिया, व्यक्तिगत आयुष्यात मात्र एकाकी आणि दुःखी होता. चार्लीचा जन्म १८८९ ला लंडनमध्ये झाला. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे तीन वर्षांचा असतानाच आईवडील विभक्त झाले. त्यामुळं वडिलांचं प्रेम त्याला जास्त दिवस मिळालं नाही. चार्लीची आई गायिका होती. नकला आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करून ती संसाराचा गाडा ओढत होती. मात्र कंठाशी निगडित असलेल्या एका आजारात तिचा आवाज पूर्णपणे बंद झाला. या सगळ्याचा ताण येऊन तिचे मानसिक संतुलन बिघडले. आईचा एकमेव आधारही गेला, त्यामुळं वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी छोट्या चार्लीला आश्रमात जाऊन राहावं लागलं. खेळण्या बागडण्याच्या वयात त्याला पोट भरण्यासाठी धडपड करावी लागत होती. शिक्षण अर्धवट सोडून तो छोटे मोठे नकलांचे कार्यक्रम आणि कॉमेडी शो करू लागला. त्याचे नाव कानावर येऊन अमेरिकेतील "फ्रेड कार्नो " कंपनीने त्याला बोलावून एका चित्रपटात मुख्य भूमिका दिली, त्यानंतर चार्लीने कधी मागे वळून बघितले नाही. स्वतःला इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळे ठरवण्यासाठी त्याने विशिष्ट मूक अभिनय सुरू केला. दरम्य...

आर्यभटांनी कधीही शून्याचा शोध लावला किंवा शोधला नाही! गणिताच्या उद्देशाने त्यांनी शून्याच्या अद्वितीय चिन्हाचा शोध लावला.

Image
ही भारतातील सर्वात मोठी गैरसमज आहे. यामुळे भारतीयांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. आर्यभटांनी कधीही शून्याचा शोध लावला किंवा शोधला नाही! गणिताच्या उद्देशाने त्यांनी शून्याच्या अद्वितीय चिन्हाचा शोध लावला. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे. शून्य ही संकल्पना म्हणून आर्यभटांपूर्वीही बरीच गणितातील अभिव्यक्त केली गेली आहे. शून्य आणि काहीही नाही ही संकल्पना काळाच्या सुरुवातीपासूनच प्रचलित आहे. शून्याच्या मूल्यासाठी आर्यभटांनी आधुनिक चिन्हाचे योगदान दिले आहे. त्याला न सुरुवात आहे, ना शेवट आहे. कोणत्याही बाजू नाहीत. हे देखील तथ्य आहे की आपण गणना केली पाहिजे की शून्य ही आपण लागू केलेली काहीतरी आहे. ० वापरल्याशिवाय आपण अनिश्चित काळादेखील मोजू शकतो. ० हे प्रतीक, सुविधा आणि संमेलन आहे, गणिताची प्राथमिकता नाही. शंभर पर्यंत मोजताना आपण किती वेळा "शून्य" शब्द उच्चारता? एकदा पण नाही ना? पॉवर १७ पर्यंत १० च्या शक्तींसाठी एक संकेत वेदिक काळापासून आधीच वापरात होता. १० शब्दाची शक्ती दर्शविण्यासाठी एक शब्द वापरला गेला आहे. संख्या एक, दहा, शंभर, हजार, दहा हजार इत्यादि सूचीतील शब्दांच्या अनुक्रमानु...

कॉम्प्युटरचा किबोर्ड ABCD या प्रमाणे सेट का करत नाहीत?

Image
कॉम्प्यूटवर टायपिंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की कीबोर्ड च्या कीज सरळ वाचता येईल अशा अल्फाबेटिकली (abcd)ऑर्डरने का दिला जात नाही? आता स्मार्टफोनवरही दिसणारा टचस्क्रीन कीबोर्डही तसाच क्वर्टी querty) प्रकारचा असतो. याचे उत्तर आपण कधी ना कधी कोणाला तरी विचारलेले असते मात्र ते बहुतेकवेळा मिळत नाही. तर यासाठी 19 व्या शतकात जावे लागेल ज्यावेळी चार्ल्स बेबेज नावाच्या गणित तज्ञाने सर्वप्रथम प्राथमिक स्वरुपातील कॉम्प्युटरचा शोध लावला. त्यामुळे बेबेजला कॉम्प्युटरचा पिता असेही संबोधण्यात येते. बेबेजच्या कॉम्प्युटरनंतर आतापर्यंत कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये जमीन अस्मानाचे बदल झाले आहेत. परंतु एक गोष्ट अजिबात बदलली नाही ती म्हणजे कॉम्प्यूटरचा क्वर्टी कीबोर्ड. बेबेज जेव्हा कॉम्प्युटरच्या कीबोर्डच्या बटणांचा क्रम निश्चित करीत होते. तेव्हा त्यांना आढळून आले की कीज त्या काळातील टाईपराईटर मशिनप्रमाणे अल्बाबेटिकली क्रमात सेट केल्या तर त्या जाम तर होत होत्याच याशिवाय abcd क्रमाने त्या वेगवेगळ्या स्पेलिंगसाठी दाबतानाही अडचणी येत होत्या. टाईपरायटरमध्ये बॅकस्पेस बटण नसल्यामुळे टायप...

बेरोजगारांना व्यवसाय

केंद्र सरकारच्या सामुदायिक विकास योजनेतून विविध व्यवसाय व उद्योगांचे प्रशिक्षण बेरोजगारांना दिले जाते आहे. उद्दिष्टे ४५ लाखांना व्यवसायसंबंधी प्रशिक्षण. अध्यक्ष सचिव महाव्यवस्थापक प्राचार्य समन्वयक केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या सामूहिक विकास योजनेतून देण्यात येणाऱ्या  विविध व्यवसाय प्रशिक्षणामुळे रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. या स्थितीत अशा प्रशिक्षणाची संख्या वाढवून या सोबत प्रशिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे अशा कार्य शाळांची प्रशिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे.

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

Image
देवगिरींच्या यादवांचा नाश झाल्यावर महाराष्ट्रात आणि भारतात काही काळ खिलजी आणि तुघलक घराणे यांची अधिसत्ता होती. ही अधिसत्ता १३४७ पर्यंत टिकली. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने दिल्लीच्या या दोन राजवटींचा विचार करायचा झाल्यास या दोन्ही राजवटी लोकाभिमुख होत्या असे म्हणता येणार नाही. या राजवटिंमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा फायदा होण्याऐवजी नुकसान झाले असे म्हणावे लागेल. इ.स. १३४७ मधे दक्षिणेतील अमिरांनी बंड पुकारून आपल्यामधीलच एका सरदाराला (हसन गंगू) ला राज्यपद दिले. अशाप्रकारे बहमनीशाही(बम्मनशाही, ब्राह्मण शाही) साम्राज्याचा उदय झाला. बहमानींचे राज्य १३४७ पासून खऱ्या अर्थाने १४८२ पर्यंत टिकले. जवळपास सर्व दक्षिण देश बहमानींच्या अमलाखाली होता. बहमानींच्या जवळपास १५० वर्षांच्या कालखंडात असे स्थैर्य त्यांना कधीच लाभले नाही. बहमानींच्य काळात परदेशी आणि दक्षिणी मुसलमान यांच्यामधील संघर्षामुळे अनेक वेळा कधी परदेशी तर कधी दक्षिणी मुसलमानांची अतिशय भयानक अशी कत्तल झाल्याचे आपल्याला आढळून येते. किंबहुना अशाच एका वादाने बहमानींचे साम्राज्य उर्जितावस्थे...

निजामशाही

Image
अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५) अहमदनगराची निजामशाही ही मध्ययुगात दक्षिण आशियातील दख्खन प्रदेशात अस्तित्वात असलेली सल्तनत होती. २८ मे, इ.स. १४९० रोजी मलिक अहमद या जुन्नर येथील बहमनी सेनापतीने उर्वरित बहमनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली. स्थापना इ.स. १४८६ साली निजाम-उल-मुल्क ह्या बहामनी सुलतानाच्या सरदाराची बिदर शहरात दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहामनी सल्तनीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि जुन्नर हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले. मे २८, इ.स. १४९० रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे अहमदनगर असे नामांतर केले. पुढील जवळपास १४० वर्षे त्याच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. चांद बिबी ह्या हुसेन निजामाच्या मुलीने आणि अली आदिलशाहाच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगराचा किल्ला लढवत ठेवला होता. मलिक अ...

आसफ़ जाही राजवंश

Image
आसफ जाह I                  क़मरुद्दीन खान आसफ जाह I इस राजवंश की स्थापना क़मरुद्दीन खान आसफ जाह I, एक महान और मुगल दरबारी ने की थी़ [1] आसफ़जाहि निजाम आम तौर पर सात ही गिने जाते हैं हालांकि वे दस थे। नासिर जंग, मुजफ्फर जंग और सलाबत जंग जो एक दशक के लिए इस शासन पर राज किया़; इन्हे केवल डेक्कन के सूबेदार के रूप में ही गिना जाता है। आसफ़जाह का संस्थापक राज्य - हैदराबाद, विस्तारित से नर्मदा से त्रिचिनापल्ली तक; और मछलीपट्टनम से बीजापुर तक थी। _______________________________________________ आसफ जाह II निजाम-उल-मुल्क के चौथे बेटे, निज़ाम-अली-खान - अासफ जाह II का जन्म 24 फरवरी १७३४ में हुआ था़ ़ उन्होंने 28 साल की उम्र में दक्कन की सुबेदारी को ग्रहण किया और लगभग 42 वर्षों तक दक्कन पर शासन किया - (निजामों में सबसे लंबी अवधि)। उनका शासन असफ़ जाही राजवंश के इतिहास में सबसे महत्वपूर्ण अध्यायों में से एक था। निजाम साम्राज्य को मजबूत करने के अपने प्रयासों में से एक था की उसने दक्कन राजधानी को औरंगाबाद से हैदराबाद बदली थी। उन्होंने सबसे महत्वपू...

हैद्राबादके निजाम

Image
हैदराबाद के निज़ाम किसी अन्य भाषा में पढ़ें ध्यान रखें संपादित करें हैदराबाद के निज़ाम-उल-मुल्क (उर्दू:نظام - ال - ملک وف حیدرآبا, तेलुगु: నిజాం - ఉల్ - ముల్క్ అఫ్ హైదరాబాద్, मराठी: निझाम-उल-मुल्क ऑफ हैदराबाद, कन्नड़: ನಿಜ್ಯಮ್ - ಉಲ್ - ಮುಲ್ಕ್ ಆಫ್ ಹೈದರಾಬಾದ್), हैदराबाद स्टेट  की एक पूर्व राजशाही थी, जिसका विस्तार तीन वर्तमान भारतीय राज्यों आंध्र प्रदेश, कर्नाटक और महाराष्ट्र में था। निज़ाम-उल-मुल्क जिसे अक्सर संक्षेप में सिर्फ निज़ाम ही कहा जाता है और जिसका अर्थ उर्दू भाषा में क्षेत्र का प्रशासक होता है, हैदराबाद रियासत के स्थानीय संप्रभु शासकों की पदवी को कहा जाता था। निज़ाम 1719 से हैदराबाद रियासत के शासक थे और आसफ़ जाही राजवंश  से संबंधित थे। हैदराबाद के निज़ाम–उल-मुल्क पूर्व राजशाही                                    कुलचिह्न उस्मान अली खान प्रथम राजा क़मरुद्दीन खान अंतिम राजा उस्मान अली खान प्रकार हिज़ एक्ज़ॉल्टेड हाइनेस आधिकारिक निवास चौमोहल्ला पैलेस राजशाही की शुरुआत 1720 स...